
कोल्हापूर – शहरात १६ मेपासून कडक दळणवळण बंदी घोषित केल्यामुळे दूध आणि औषधे वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. महापालिकेने घरपोच भाजीपाला देण्यासाठी केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पहिले २ दिवस शहरातील काही भागात भाजी विक्रेते भाजी घेऊन येत होते. पोलिसांनी अडवणूक केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीसाठी शहरात येण्यास सिद्ध नाहीत.
दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर ४ दिवसांपूर्वी खरेदी केलेला भाजीपाला काही व्यापारी विक्री करत आहेत. खराब स्थितीतील आणि चढ्या दराने नागरिकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा भाजीपाल्याचे मुख्य केंद्र समजला जातो. येथून विविध प्रकारची ताजी भाजी कोल्हापूर शहराला पुरवण्यात येते; मात्र कडक दळणवळण बंदीमुळे शेतकरी शहराकडे फिरकत नाहीत.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
गोव्यात पुढील १५ दिवस पाऊस न पडल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा ! – सुभाष फळदेसाई, पाणीपुरवठामंत्री
वृत्तपत्राच्या कागदावरून वडापाव विकणार्या २६ दुकानांवर मुंबईत कारवाई !
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
‘आकाशवाणी पुणे’ विभागातील वृत्त विभाग बंद होणार ?