सातारा – गत २ आठवड्यांत देशातील कोरोनाबाधित रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकारने नुकतीच घोषित केली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या नातेवाइकांना ‘ऑक्सिजन बेड’साठी धावाधाव करावी लागत आहे. सातारा जिल्ह्यात १३ ते १९ एप्रिल या कालावधित ८ सहस्र ९५८, २० ते २६ एप्रिल या कालावधीत १२ सहस्र १९४ आणि २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीत १५ सहस्र ३२८ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच १० मे पर्यंत जिल्ह्यात कडक दळणवळण बंदी लागू केली आहे. जिल्ह्यात केवळ औषधालये चालू असून अन्य व्यवहार पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक