२ मास विनामूल्य शिधा, तर रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्य !

दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !

अरविंद केजरीवाल

नवी देहली – कोरोनामुळे देहलीमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. आता देहली सरकारने राज्यातील अनुमाने ७२ लाख शिधावाटप कार्डधारकांना २ मासांसाठी विनामूल्य शिधा देण्याची घोषणा केली आहे. तसेच रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्यही देण्यात येणार आहे.