वर्ष २०२० मध्ये रेल्वे तिकिटांमध्ये काळाबाजार करणार्‍या ४६६ दलालांवर गुन्हे नोंद

एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.

मुंबई – दळणवळण बंदीच्या काळात वैयक्तिक ‘ई-मेल आय.डी.’चा उपयोग करून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या ४६६ दलालांवर रेल्वे सुरक्षादलाकडून कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या दलालांकडून २ कोटी ७८ लाख रुपयांची १४ सहस्र ३४३ तिकिटे कह्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईतील २६२ दलालांचा समावेश आहे.