११ वर्षांनंतर माणिकपूर (पालघर) येथील २ लाचखोर पोलिसांना शिक्षा

एवढ्या विलंबाने न्याय म्हणजे अन्यायच !

ठाणे – माणिकपूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे अन् पंचनाम्याची प्रत देण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतली होती. वर्ष २००९ मध्ये झालेल्या या गुन्ह्याचा निकाल लागला असून सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी संजय देशमुख यांना ४ वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर आरोपी बाबासाहेब बोरकर यांना ४ वर्षे सश्रम कारावास आणि १० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा वसई सत्र न्यायालयाने सुनावली आहे.