खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. विशेषतः किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची त्यांच्या देहली येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसलेे यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना राजमुद्रेची प्रतिकृती भेट म्हणून दिली. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा आणि सातारा जिल्ह्याचे इतिहासातील महत्त्व यांविषयी माहिती सांगितली.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण