खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. विशेषतः किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची त्यांच्या देहली येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसलेे यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना राजमुद्रेची प्रतिकृती भेट म्हणून दिली. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा आणि सातारा जिल्ह्याचे इतिहासातील महत्त्व यांविषयी माहिती सांगितली.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !