
सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली.
प्र. नाळे पुढे म्हणाले की, महावितरणने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये गत दीड मासात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्या उघडकीस आणल्या आहेत. नियमित विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील जोडण्यांविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. उघडकीस आणलेल्या वीजचोर्यांपैकी ५६६ प्रकरणांत ९९ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली आहे. वीजचोर्यांच्या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये कारवाई चालू आहे. दंड, कारावासाची शिक्षा आणि मानहानी टाळण्यासाठी वीजचोरी थांबवून अधिकृत जोडण्या घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !