
मुंबई – प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेच्या वेळेत पालट करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वांसाठी लोकलगाड्यांची सुविधा चालू झाली; मात्र वेळेची मर्यादा घालण्यात आल्याने नोकरदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या या निर्णयावर मुंबईकरांकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असले, तरी वेळेच्या मर्यादा घालूनही गर्दी कायम आहे. अनुमाने २५ लाख प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोचता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मुंबईकरांच्या सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच पालट करण्यात येतील. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !