
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणात अनेक गोष्टींचा उलगडला झाला; मात्र सुशांत यांचा मृत्यू कशामुळे झाला ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा या प्रकरणात जो निष्कर्ष काढेल, तो मुंबई पोलिसांच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.

या वेळी परमवीर सिंग म्हणाले, ‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’
सायबर गुह्यांचा धोका लक्षात घेता लवकरच शहरात ५ सायबर पोलीस ठाणी चालू करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !