
सातारा – सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये जिल्ह्यातील चिंचणेर-निंब गावातील सैनिक सुजित कीर्दत यांना वीर मरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव २३ डिसेंबर या दिवशी चिंचणेर-निंब गावात आणण्यात आले. पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लष्करी वाहनातून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौका-चौकात श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेत अमर रहे, अमर रहे, सुजित कीर्दत, अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या वेळी सहस्रोे ग्रामस्थ उपस्थित होते.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक