
नगर – केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला संवैधानिक आणि स्वायत्त दर्जा देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमीभाव देणे यासंबंधीच्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. यावर योग्य निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दोन वेळा दिले; मात्र लेखी आश्वासन पाळले नसल्याने आता जीवनातील शेवटचे उपोषण करायचे ठरवले आहे. त्यासाठी देहलीच्या रामलीला मैदानाची अनुमती मागितली आहे. मंदिरात रहाणार्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ?, अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी विनंती भाजप नेत्यांनी हजारे यांना केली. हजारे यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने ‘त्यांनी या वयात उपोषण करू नये’, असा आग्रहही त्यांनी धरला. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही खासदार डॉ. कराड यांनी सांगितले; मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर देहलीत आंदोलन न करण्याची भाजपच्या शिष्टमंडळाची विनंती हजारे यांनी धुडकावून लावली आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास