
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. राज्यभरातून येणार्या अनुमाने साडेतीनशेहून अधिक दिंड्या आणि पंढरपूर, तसेच विविध ठिकाणांहून येणार्या पालख्या आळंदीत आलेल्या नाहीत. सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याची खंत वारकर्यांच्या मनामध्ये आहे.
परंपरेनुसार अष्टमीपासून नैमित्तिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. ज्यांचे कीर्तन आणि जागर होणार आहेत, त्यांच्या वैद्यकीय पडताळणीसाठी विशेष वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. इंद्रायणी घाटावर पोलीस बंदोबस्त असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी दिसल्यावर कारवाईची चेतावणी देण्यात येत आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)