बालकांच्या उपचारात हलगर्जीपणा करणारा आरोग्यविभाग ! शासनाने योजना अस्तित्वात आणून न थांबता त्याचा वापर प्रभावीपणे होतो का, याकडे कटाक्षाने लक्ष देणे अपेक्षित आहे.
पुणे – चालतांना अडखळणे, जन्मतः हृदयाला छिद्र असणे, थॅलसेमीया इत्यादी विकासात्मक अपंगत्वावर योग्य वेळी आणि अचूक उपचार केल्यास अपंगत्वावर अन् जन्मजात व्यंगावर मात करता येते. यासाठी सरकारची आर्.बी.एस्.के. योजना अस्तित्वात आहे; परंतु जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यांमुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे, असे जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्थेच्या (बी.डी.सी.डी.आर्.सी.) संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा आरोग्यशास्त्र विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. त्यामधून अपंगत्वाचे निदान झालेल्या ८० टक्के बालकांच्या उपचारात खंड पडत असल्याचा निष्कर्ष आला आहे.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !