बालकांच्या उपचारात हलगर्जीपणा करणारा आरोग्यविभाग ! शासनाने योजना अस्तित्वात आणून न थांबता त्याचा वापर प्रभावीपणे होतो का, याकडे कटाक्षाने लक्ष देणे अपेक्षित आहे.
पुणे – चालतांना अडखळणे, जन्मतः हृदयाला छिद्र असणे, थॅलसेमीया इत्यादी विकासात्मक अपंगत्वावर योग्य वेळी आणि अचूक उपचार केल्यास अपंगत्वावर अन् जन्मजात व्यंगावर मात करता येते. यासाठी सरकारची आर्.बी.एस्.के. योजना अस्तित्वात आहे; परंतु जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यांमुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे, असे जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्थेच्या (बी.डी.सी.डी.आर्.सी.) संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा आरोग्यशास्त्र विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. त्यामधून अपंगत्वाचे निदान झालेल्या ८० टक्के बालकांच्या उपचारात खंड पडत असल्याचा निष्कर्ष आला आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवला
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत