‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।

ग्रीक, रोमन अन् बेबिलोन संस्कृतींच्या उत्कर्षाने जग दिपले ।
परंतु आता नाव तयांचे इतिहासीच केवळ उरले ॥ १ ॥

श्री. जयंत रानडे

‘हिंदु राष्ट्र अमर असे’ हे अनादी काळही सांगतसे ।
अमरत्वाचे कारण न कळल्याने जग आश्‍चर्य करतसे ॥ २ ॥

सहस्रोे वर्षांच्या परकियांच्या आक्रमणाने भारत नष्ट होत नसे ।
मिशन तयांचे पूर्ण न झाले ‘नरेंद्र’ (टीप १) कारण सांगतसे ॥ ३ ॥

भौतिकता सर्वस्व मानता मानवी जीवन अपूर्ण असे ।
अध्यात्माचा पाया देणे, राष्ट्र्राचे या कार्य असे ॥ ४ ॥

वेद, पुराणे, संतचरित्रे, ‘महाभारत’ अन् ‘रामायण’ स्मरा ।
तेव्हा सूज्ञा ध्यानी येईल, ‘धर्म हाच प्राण’ असे खरा ॥ ५ ॥

धर्म कल्पना ही हिंदूंची, पर्यायी त्या शब्द नसे ।
सकल ‘मतांची’ (टीप २) माळ गुंफिण्या शक्ती पुरेशी त्यात असे ॥ ६ ॥

करता आवाहन त्या धर्मा, जागृत भारत होत असे ।
त्या डावलता भारतीय तो उच्च रवाने घोरतसे ॥ ७ ॥

मानवतेच्या धर्मासाठी ‘हिंदु’ हा प्रतिशब्द असे ।
‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व मानिले’ हेे सत्य ‘शिकागो’ (टीप ३) सांगतसे ॥ ८ ॥

परंतु बुद्धी भ्रमिष्ट झाली, इंग्रज त्यास कारण असे ।
कारण नाही तोही केवळ, आमुची ही विस्मृती असे ॥ ९ ॥

निधर्मितेचा डंका पिटवूनी मरगळ आमुची जात नसे ।
धर्मस्थापना हा हिंदूंचा परंपरेने धर्म असे ॥ १० ॥

‘मानवमूल्ये’ अर्थ असे हा ऋषिमुनींच्या या धर्माचा ।
‘रिलिजन’ त्यासी मानून गोंधळ केला सर्वांचा ॥ ११ ॥

किती करंटे त्यांचे वंशज, धर्मही स्थानी निषेधला ।
निधर्मी भारत करण्यासाठी गलका बेंबीतून केला ॥ १२ ॥

काय लागले फळ त्या यत्ना भारतभूला विभाजिले ।
धर्म त्यागता ध्वजही गेला (टीप ४) एकतेसही दुभंगिले ॥ १३ ॥

धर्मकारणे देश खंडूनही झोप आमुची जात नसे ।
भारत ‘हिंदु राष्ट्र’ मानण्या सिद्ध आम्ही होत नसे ॥ १४ ॥

‘हिंदु भूमी सम्राट’ असूनही (टीप ५) मी ‘बाबरनामा’ (टीप ६) लिहीतसे ।
मात्र श्रींच्या इच्छेखातर शिवाजीराजे हिंदु राज्य स्थापितसे ॥ १५ ॥

राष्ट्र कल्पना नवी नसे ती वेदांपासून ज्ञात असे ।
‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन (टीप ७), वादातीत हे सत्य असे ॥ १६ ॥

जागृत व्हा हिंदू बंधूंनो, हिंदु राष्ट्र्राचा जयघोष करा ।
आपली भाषा, आपला देश अन् धर्म यांचा अभिमान धरा ॥ १७ ॥

संघटनेला बाधा येईल अशा विकृती टाकूनी द्या ।
संघ भावना सुदृढ होईल ती ही संस्कृती जाणूनी घ्या ॥ १८॥

स्मरा केशवा, शिवा, माधवा, विनायका अन् गुरु गोविंदा ।
चला, अनुसरा, सहर्ष अर्पा सर्वस्वा आपुल्या समिधा ॥ १९ ॥

व्यक्ती तितुके देव असे जरी, समान दैवत नित्य असे ।
पूजा भारतमातेची करण्या संघे युगाचा (टीप ८) मंत्र असे ॥ २० ॥

पूजन आम्ही कसे करावे आपुल्या भारतमातेचे ।
चला, विचारा तिजला आता ‘काय तुला गे आवडतेे ?’ ॥ २१ ॥

विचारता तिज काय म्हणे ती लक्ष देऊन ऐका हो ।
परंपरेचे भान ठेवता उत्तर ऐकू येईल हो ॥ २२ ॥

‘नकोत मजला उदक, फळे, नकोत कुसुमे अन् पाने ।
नको भोजने, नको शर्करा आणि नको पशूंची बलीदाने ॥ २३ ॥

प्रसन्न होण्या तुम्हावरी मी, काय हवे मज जाणूनी घ्या ।
भारतमाता स्पष्ट सांगते, ‘तुम्ही आपुलेच बलीदान द्या’ ॥ २४ ॥

नको बलीदाने वृद्ध, जर्जर, गलितगात्र अन् निःसत्त्वांची ।
हवीत सबल, सुगंधित, पौरुषशाली तरुण आणि तरुणींची ॥ २५ ॥

धर्मासाठी प्राण अर्पू्न धर्मवीर संभाजीने ।
जनसामान्या जागृत केले बलिदानाच्या स्फुल्लिगांने ॥ २६ ॥

म्हणून लक्ष वीर ते उभे ठाकले प्राणपणाने लढण्याला ।
बोलूनी ‘हर हर महादेव’ औरंग्यासही गाडियला ॥ २७ ॥

‘कोण म्हणे संभाजी वधिला ?’ अमर तयाची कीर्ती असे ।
देव, देश अन् धर्म रक्षिण्या स्फूर्ती पिढ्यांना देत असे ॥ २८ ॥

चला हिंदूंनो, संघटीत व्हा, भारतमातेचा जयजयकार करा ।
ऋषिमुनींच्या अपूर्ण स्वप्ना, याची देही साकार करा ॥ २९ ॥

पुनश्‍च आपुले हिंदु राष्ट्र करील नेतृत्व जगाचे ।
प्रयत्न होता योग्य दिशेने फळ त्या निश्‍चित मिळेल ते ॥ ३० ॥

उणिवा दिसतील काव्य म्हणोनी, दोष तुम्ही तो पाहू नका ।
नव्हे कवी मी ठाऊक मजला, भाव मनीचा तुम्ही पहा ॥ ३१ ॥

टीप १ : स्वामी विवेकानंद

टीप २ : हिंदु धर्मातील अनेक साधनामार्ग आणि मते

टीप ३ : शिकागोतील जागतिक धर्मपरिषदेत विवेकानंदांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगणे

टीप ४ : भारताची फाळणी होऊन धर्म आणि त्याचसमवेत ध्वजही वेगळा झाला.

टीप ५ आणि ६ : मोगल सम्राट बाबराने आत्मप्रौढी सांगणारे ‘बाबरनामा’ नावाचे एक पुस्तक लिहून घेतले. त्यात तो स्वतःला ‘हिंदुस्थानच्या म्हणजे भारताच्या भूमीचा सम्राट’ म्हणवतो. त्यात तो भारताचा उल्लेख ‘हिंदु भूमी’ असाच करतो; परंतु बाबर जरी स्वतःला तात्कालिक सम्राट म्हणवत असला, तरी खरे हिंदु भूमीचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज होत; कारण श्रींच्या इच्छेखातर त्यांनीच हिंदूंच्या या भूमीत हिंदूंचे राज्य स्थापन केले. तेव्हा ‘अंतिम विजय हिंदूंचाच होतो’, हे यावरून लक्षात येते.

टीप ७ : लाखो वर्षांपासून म्हणजे अगदी वेदांमध्येही ‘हिंदु राष्ट्र’, ‘हिंदु समाज’, ‘हिंदु धर्म’, ‘हिंदु परंपरा’ या संकल्पनांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना नवीन नसून ती जुनी आणि चिरंतनच आहे.

टीप ८ : ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’, म्हणजे ‘कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.’

– श्री. जयंत रानडे, विश्रामबाग, सांगली. (दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक) (२०.५.२०२०)