
मुंबई – कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. ‘कोरोनाच्या धोक्यापासून दूर रहाणे, हे प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन ठेवावे आणि संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !