समष्टीला ज्ञानाचा आनंद देणार्‍या ग्रंथलिखाणासाठी मोक्षाचीही अपेक्षा न ठेवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी जे काही ग्रंथलिखाण करत आहे, ते केवळ मला आनंद मिळावा यासाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीला त्या ज्ञानातील आनंद मिळावा यासाठी ते करत आहे. अशी ज्ञानाचा आनंद देणारी ग्रंथलेखन सेवा मला आवडते. ती पुढच्या जन्मात पुन्हा मिळाली, तर आनंदच होईल. त्यामुळे ‘पुढचा जन्म नको, मी मोक्षाला गेलो, तर बरे !’, असे मला कधी वाटत नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हल्लीच्या काळातील मनुष्याचे आयुष्य केवळ नश्वर देहाचे चोचले पुरवण्यात, उदा. चांगले कपडे, चांगले खाणे यातच जात आहे. साधना करून मनुष्यदेहाचे सार्थक करण्याचा विचार कुणीही करत नाही ! तो केल्यास साधनेत प्रगती होऊन मनुष्यजन्माचे सार्थक होते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले