जुन्या कसारा घाटात संरक्षण भिंत कोसळली

४ मासांपूर्वीच झाली होती दुरुस्ती !

सौजन्य : पुढारी वृत्तसेवा

ठाणे – मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ ११ जुलैच्या पहाटे सुमारे २० फूट लांबीची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे महामार्गाच्या कडेला तडे गेले असून नाशिककडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने चालू करण्यात आली आहे. अवघ्या ४ मासांपूर्वी येथे संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र ती पावसात टिकली नाही.

संपादकीय भूमिका

कुठे दुरुस्त केलेली संरक्षण भिंत ४ मासांत कोसळण्याची स्थिती येऊ देणारे आजचे भ्रष्ट अन् दायित्वशून्य प्रशासन !