२६ आरोपींवर गुन्हा नोंद, तर १३ जण अटकेत

मंचर (पुणे) – मंचर परिसरात बनावट दुधाची निर्मिती करणार्या मोठ्या टोळीला अन्न सुरक्षा विभागाने अटक केली. या प्रकरणात मंचर पोलीस ठाण्यात २६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांपैकी १३ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना घोडेगाव न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईत २ लाख ४ सहस्र ४९० रुपयांचा मुद्देमाल आणि १ सहस्र ३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले.
या टोळीचे कार्यक्षेत्र पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले आहे. याची व्याप्ती अजून मोठी असण्याची शक्यता अन्वेषण यंत्रणेने व्यक्त केली असून अधिकचे अन्वेषण चालू आहे.
आर्थिक लाभासाठी आरोपींनी विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध सिद्ध करणे, त्याची साठवणूक करणे आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण मंचर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून चालू आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर