‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पताका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ !

पंढरपूर भक्तीसागर वारकऱ्यांसाठी सज्ज होत आहे !

देहू-आळंदी (जिल्हा पुणे), ५ जुलै (वार्ता.) – वारकर्‍यांचे डोळे ज्या दिंडी सोहळ्याकडे लागतात, अखेर तो दिवस अगदी एक दिवसावर आला असून ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पतका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ झाला आहे. देहू-आळंदी आणि पंढरपूर पांडुरंगाच्या भक्तीत बुडून गेले असून सर्वच चैतन्य आणि श्री विठ्ठलाच्या भेटीची अपूर्व ओढ पहायला मिळत आहे. देहू-आळंदीत पाऊस असला, तरी दिंड्यांची लगबग चालू आहे. पुणे शहरही या आठवड्यात दिंडीमय झालेले आढळून येणार आहे.

केरळ आणि तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतांना

पंढरपूर – केरळ आणि तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी ५ जुलैला श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.