
‘२५.६.२०२६ या दिवशी सकाळी ८ वाजता एका साधकाची शस्त्रक्रिया ठरली होती. त्या दिवशी सकाळी ६ वाजता त्या साधकाचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी आणि शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे अन् लाभदायक होण्यासाठी मी उपाय शोधून दिले. त्याप्रमाणे ते उपाय साधकाच्या नातेवाइकांनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ‘त्या साधकासाठी पुन्हा काही उपाय करायचे का ?’, असे मला विचारण्यात आले. तेव्हा मी ‘आता त्या साधकाला कोणताही त्रास जाणवत नाही’, असे सांगितले. त्यानंतर मी प्रतिदिन करत असलेला श्रीरामाचा जप येता-जाता करू लागलो. नामजप करत असतांना माझे लक्ष शस्त्रक्रिया होणार असलेल्या साधकावर केंद्रित झाले. माझ्या मनात विचार आला, ‘आता त्या साधकाच्या शस्त्रक्रियेला आरंभ झाला आहे.’ मी येता-जाता माझा नामजप करत होतो; पण माझे लक्ष त्या साधकावर केंद्रित होते. काही वेळाने अकस्मात् मला जाणवले, ‘आता त्या साधकाची शस्त्रक्रिया २५ टक्के पूर्ण झाली.’ त्यानंतर प्रत्येक ५ – १० मिनिटांनी ‘त्या साधकाची शस्त्रक्रिया किती टक्के पूर्ण झाली ?’, हे मला आपोआप कळत होते. ही प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत, म्हणजे १ घंटा चालू होती. तेव्हा मला आतून वाटले, ‘आता शस्त्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाली आहे.’ मी तसे साधकाच्या नातेवाइकांना कळवले. त्यानंतर १० मिनिटांनी त्यांचा निरोप आला, ‘तुम्ही सांगितले, ते अगदी योग्य आहे. शस्त्रक्रिया छान झाली. त्याला आता बाहेर आणले.’
गुरुकृपेने मला अशी अनुभूती प्रथमच आली. अनुभूतीच्या कालावधीत मी जागृत ध्यानावस्था अनुभवली.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.६.२०२६)
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
मुंबईतील राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करतांना साधिकेला आलेली अनुभूती