वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात मुंबई

मुंबई, २२ जून (वार्ता.) – वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजे मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले. ही महत्त्वाची माहिती गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. या कारवाईमध्ये वर्ष २०२४ मध्ये २०२, वर्ष २०२५ मध्ये २ सहस्र ७३६, तर मे २०२६ पर्यंत ६०३ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी करण्यात आली. काही घुसखोरांविषयी न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

श्री. प्रीतम नाचणकर

शासकीय योजनांतील घुसखोराचा शोध घेण्याच्या विलंबाविषयी माहिती मागवली !  

आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची सरकारकडे पाठवली आहे. या आधारे सरकारच्या विविध खात्यांतील योजनांचा लाभ बांगलादेशी घुसखोर घेत आहेत का ?, याचा शोध चालू आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पुरवठादारांनाही ही सूची पाठवण्यात आली आहे. ही सूची पाठवून १ वर्ष होऊनही अद्याप एकाही जिल्ह्यातून याविषयीचा आढावा सरकारकडे आलेला नाही. याविषयी विचारले असता या प्रकरणी माहिती मागण्याची सूचना राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.