नवी मुंबई – संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पावसामुळे उद्भवणार्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने प्रवाशांनी परिवहनच्या बसगाड्यांतून प्रवास करतांना त्या मध्येच बंद पडल्या, काही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास किंवा सेवाविषयक काही तक्रारी असल्यास उपक्रमाच्या १८००२२००४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सेवा २४ घंटे निःशुल्क कार्यान्वित आहे. ८३५६८३३५७० व ८३५६८३३५७१ या भ्रमणभाष क्रमांकावरही संपर्क साधावा.
तुर्भे आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३५६६, आसुडगाव आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३३९० व घणसोली आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३५४५ हे आहेत. आपत्कालीन स्थितीत या क्रमांकावर सुध्दा संपर्क साधू शकतात, जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या अडी-अडचणी दूर करून अधिकाधिक सुरळीत आणि सुरक्षित सेवा देणे सोईस्कर होईल, असे आवाहन योगश कडुसकर यांनी केले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई !
गणेशोत्सवापूर्वी मुंबई महापालिकेकडून विसर्जन स्थळांवर सिद्धता चालू !