चंद्रपूर येथे वाघिणीच्या आक्रमणात ४ महिलांचा मृत्यू !

चंद्रपूर – जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही अरण्यात तेंदूपत्ता गोळा करत असतांना १३ महिलांवर वाघिणीने आक्रमण केले. या भीषण घटनेत ४ महिलांचा मृत्यू झाला, तर इतर महिला बचावल्या. ही घटना २२ मे या दिवशी सकाळी ९ वाजता घडली. अचानक झालेल्या आक्रमणामुळे महिला घाबरल्या. एका महिलेने गावात येऊन माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. मृत महिलांमध्ये कवडूबाई, अनुबाई, संगीता आणि सुनीता मोहुर्ले यांचा समावेश आहे. वन विभागाने अन्वेषण चालू केले असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. गतवर्षीही याच भागात ३ महिलांचा वाघाच्या आक्रमणात मृत्यू झाला होता.