घरात नमाजपठणाला जागा नसेल, तर लोकसंख्या अल्प करा ! – Yogi Adityanath

  • रस्त्यावरील नमाजपठणावरून उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुसलमानांना थेट सल्ला

  • ‘संवादाने ऐकले, तर संवादाने... नाहीतर...’ अशी चेतावणीही दिली !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रस्ते चालण्यासाठी आहेत. रस्ता अडवण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुमच्या घरात रहायला किंवा नमाजपठणासाठी जागा नसेल, तर लोकसंख्या नियंत्रित करा. जर सामर्थ्य नसेल, तर लोकसंख्या का वाढवत आहात?, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमानांना रस्त्यावर नमाजपठणावरून सल्ला दिला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,

१. लोक मला विचारतात, ‘तुमच्या उत्तरप्रदेशात खरेच रस्त्यावर नमाजपठण होत नाही का ?’ मी सांगतो, ‘मुळीच होत नाही.’

२. रस्ते चालण्यासाठी आहेत कि कुणीही येऊन तमाशा करण्यासाठी ? रस्ता अडवण्याचा काय अधिकार आहे ? ज्याचे जे प्रार्थनास्थळ असेल तिथे जाऊन त्याने ते करावे. त्यांनी (मुसलमानांनी) विचारले ‘हे कसे होईल ?, आमची संख्या अधिक आहे ?’

३. त्यावर आम्ही सांगितले की, ‘नमाजपठण आवश्यक असेल, तर तुम्ही शिफ्टमध्ये (पाळ्यांमध्ये) पठण करा, आम्ही त्याला रोखणार नाही; पण रस्त्यावर नाही. रस्ते चालण्यासाठी आहेत. आम्ही रस्ते बाधित होऊ देणार नाही. सरकारचा नियम सर्वांना समान लागू होतो.

४. आम्ही सर्वांना सांगितले आहे की, रस्त्यांवर अराजकता चालू देणार नाही. प्रेमाने ऐकले तर ठीक आहे, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबला जाईल. आमचे काम संवाद साधणे आहे. तुम्ही संवादाने ऐकले तर संवादाने… नाहीतर संघर्षही पाहून घ्या. बरेलीमध्ये लोकांनी प्रयत्न करून पाहिला, त्यांना शक्ती दिसली आहे. म्हणूनच सरकार संपूर्ण व्यवस्थेला नियमांशी जोडू इच्छिते.

संपादकीय भूमिका

  • जे काम योगी आदित्यनाथ इतक्या स्पष्टपणे सांगू आणि करू शकतात, ते अन्य सरकारे का करू शकत नाहीत ?
  • योगी आदित्यनाथ यांच्यात साधनेचे बळ असल्याने ते अशा प्रकारचे कार्य करू शकतात, यामुळे जनतेने आता साधना करणार्‍यांना सत्तेवर बसवणे आवश्यक आहे !