
जालना – ‘कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ करावे’, या प्रमुख मागणीसाठी ३० मेपासून ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ मे या दिवशी दिली आहे. ‘मराठ्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले; पण मराठा समाजाची हानी होत असेल, तर शांत बसणार नाही,’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. सरकारवर टाळाटाळीचा आरोप करत आता निर्णायक लढा होणार, असेही ते म्हणाले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !