मनोज जरांगे यांची ३० मेपासून ‘आमरण उपोषणा’ची चेतावणी !

मनोज जरांगे पाटील

जालना – ‘कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ करावे’, या प्रमुख मागणीसाठी ३० मेपासून ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ मे या दिवशी दिली आहे. ‘मराठ्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले; पण मराठा समाजाची हानी होत असेल, तर शांत बसणार नाही,’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. सरकारवर टाळाटाळीचा आरोप करत आता निर्णायक लढा होणार, असेही ते म्हणाले.