नियम मोडल्यास १ सहस्र रुपये दंड !

मुंबई – राज्यातील वाहन सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक‘ (एच्.एस्.आर्.पी.) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून १ जुलै २०२६ पासून नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांकडून १ सहस्र रुपये दंड वसूल केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच ‘एच्.एस्.आर्.पी.’साठी नोंदणी करावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा दलाल यांच्या आमिषाला फसू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !