(म्हणे) ‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल !’ – Tamil Nadu CM Joseph Vijay

बहुमताची चाचणी जिंकताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे विधान

जोसेफ विजय

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या जोसेफ विजय सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली. सरकारच्या बाजूने १४४ मते पडली आहेत, तर विरोधात केवळ २२ मते मिळाली आहेत. विजय यांचा हा पहिला मोठा विजय आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी म्हटले, ‘‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल.’’

तमिळनाडू विधानसभेतील एकूण जागांची संख्या २३४ आहे. कोणत्याही सरकारला बहुमतासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. जोसेफ विजय यांच्या सरकारला १४४ मते मिळाली आहेत. असे सांगितले जात आहे की, अण्णाद्रमुकच्या आमदारांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ म्हणजे हिंदूंना वगळून सर्व धर्मियांना विशेषतः मुसलमानांना अधिकाधिक सोयीसुविधा देणे, त्यांना तळहातावरील फोडासारखे जपणे ! त्यामुळे हिंदुद्वेषी द्रमुकला बाजूला सारून जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला निवडून दिलेल्या तेथील हिंदूंची स्थिती ‘आगीतून फुफाट्यात’, अशी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !