सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !

  • ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ९ मे या दिवशी झाला तिथीनुसार ८४ वा वाढदिवस

धर्मध्वज पूजनाच्या वेळी उपस्थित मान्यवर

कोल्हापूर, १० मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुलिंग चेतवले गेले. ही दिंडी मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड येथून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे तिची सांगता झाली. या दिंडीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.