
नागपूर – राज्यात ३ मेपासून ‘शून्य सावली’ दिवसांचा अनुभव घेता येणार असून ३१ मेपर्यंत विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली नाहीशी होणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर (९० अंश कोनात) येतो, तेव्हा कोणत्याही उभ्या वस्तूची सावली पायांखाली येते किंवा अदृश्य होते. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांमध्ये ही घटना वर्षातून दोनदा घडते.
३ मेपासून ही घटना सावंतवाडी येथे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १३ मे या दिवशी पुणे परिसर, १५ मे या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई, २६ मे या दिवशी नागपूर आणि भंडारा, ३१ मे या दिवशी तोरणमाळ, धुळे येथे शेवट होईल. दुपारी १२ ते १२.३५ पर्यंत हे अनुभवता येईल.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट