खटला मागे घ्या, नाहीतर तुमच्या दुसर्‍या मुलालाही ठार मारू ! – हिंदु कुटुंबाला मुसलमान पक्षाची धमकी

पीडित कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश !

नवी देहली – देहलीतील उत्तमनगरमध्ये होळीच्या दिवशी झालेल्या हिंदु तरुणाच्या हत्येप्रकरणी देहली उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबाच्या सुरक्षेविषयी देहली  पोलिसांना कडक निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले की, कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये कुठलीही कमतरता रहाता कामा नये. १३ एप्रिल २०२६ या दिवशी आरोपी पक्षातील बाबू खान आणि त्याच्या गुंडांनी मिळून पीडित हिंदु  कुटुंबाला धमकावले होते. त्यांनी म्हटले होते की, एकाला मारले, आता दुसर्‍याची पाळी आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर हिंदु कुटुंबाने ‘घर विकणे आहे’असा फलक लावला आहे.

हे प्रकरण ४ मार्च २०२६ या दिवशी घडले होते. या दिवशी उत्तमनगरमधील जे.जे. कॉलनीमध्ये एका तरुणाने मुसलमान महिलेवर पाण्याने भरलेला फुगा फेकला होता. यामुळे संतप्त होऊन मुसलमान जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरण देहली उच्च न्यायालयात खटला चालू आहे. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान ज्या पद्धतीने हिंदूंना ठार मारतात, दहशत निर्माण करतात आणि त्यांच्यासमोर पोलीस प्रशासन नांग्या टाकतात, हे पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !