Malegaon Blast Case : पुराव्यांअभावी ४ हिंदु आरोपींवरील दोषारोप रहित !

वर्ष २००६ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय  

मुंबई उच्च न्यायालय

नाशिक – मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २००६ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील ४ हिंदु आरोपींवरील दोषारोप रहित केले आहेत. राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायालयाने त्यांच्यावर हत्या, गुन्हेगारी कट रचणे या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रहित केला.

‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करण्यात आला नव्हता. त्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरली’, अशी भूमिका आरोपींच्या अधिवक्त्यांनी केली. ‘यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही’, असा युक्तीवादही करण्यात आला. उच्च न्यायालयाने या सर्व सूत्रांचा विचार करत आरोपींना दिलासा दिला.

या निर्णयानंतर आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले असून ‘आम्हाला विलंबाने का होईना; पण न्याय मिळाला’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

आरोपींनी मानले न्यायालयाचे आभार !