
नवी देहली – महिलांचे लोकसभा आणि विधानसभा येथील आरक्षण, तसेच मतदारसंघांची फेररचना यांच्या संदर्भातील ‘नारीशक्ती वंदन’ हे घटनादुरुस्ती विधेयक संमत करून घेण्यासाठी संसदेचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. १६ एप्रिलला पहिल्या दिवशी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यावर त्यावर चर्चा प्रारंभ झाली आहे. १७ एप्रिलला यावर मतदान घेण्यात येणार आहे. या सुधारणा विधेयकात लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसभेत चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या आहेत, तेव्हा ज्या कुणी महिलांच्या या हक्काला विरोध केला आहे, त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांना कधीही क्षमा मिळाली नाही. ज्यांना यात राजकारणाचा वास येतो, त्यांनी स्वतःच्या परिणामांचा विचार करावा. हाच एकमेव लाभ आहे; यामुळे होणारी हानी ते टाळू शकतील. त्यामुळे, याचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच, या देशातील महिला आमच्या सदोष हेतूंना कधीही क्षमा करणार नाहीत.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी