मुंबई-चिपी विमानसेवा जलदगतीने चालू करा ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

नितेश राणे, मत्स्य आणि बंदरेविकास मंत्री

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई आणि मुंबई-चिपी ही विमानसेवा जलदगतीने चालू होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. त्यांनी मंत्रालयात ७ एप्रिल या दिवशी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा चालू करण्याची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.