उत्तरप्रदेशातील ५५८ मदरशांवर होणार कारवाई !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील योगी सरकारने मदरशांमधील अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील ५५८ मदरशांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहार योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे समोर आले आहे. मदरशांनी विद्यार्थ्यांच्या माध्यान्य आहार योजनेतील निधी हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माध्यान्ह आहार प्राधिकरणाच्या संचालिका मोनिका राणी यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.
Mid-Day Meal Scam: Funds meant for students embezzled in madrasas in Uttar Pradesh; action initiated against 558 institutions.
Serious question: why are such institutions still allowed to function? Should stricter action, including bans, be enforced immediately?
PC: Hindi… pic.twitter.com/rvhvyuOmtS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
अखिल भारतीय पसमांदा समाज मंचाने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या मंचाने सरकारला कळवले की, मदरशांमध्ये कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवली जाते. तसेच विद्यार्थ्यांपर्यंत अन्नधान्य आणि निधी पोचत नाही. सरकारी निधीचा अपहार करून तो वैयक्तिक लाभासाठी वापरला जात आहे. या तक्रारीची नोंद घेऊन सरकारने चौकशीचा आदेश दिला आहे. सरकारी अधिकारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पडताळणी करतील, तसेच निधीच्या वाटपाचा आणि प्रत्यक्ष माध्यान्य आहार घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा ताळमेळ पडताळला जाईल. योगी सरकार मागील काही काळापासून मदरसा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाअशा मदरशांवर सरकार तात्काळ बंदी का घालत नाही ? |

Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी