|

मुंबई – स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे शरद पवार गटाचे नेते तथा आमदार जयंत पाटील हे भोंदू बाबा अशोक खरात याच्या संपर्कात होते. खरातने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २५ मार्च या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला. खरातने नरबळी दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी अन्वेषण चालू केले असून ‘जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घातली, ते रक्त कुणाचे होते, हे समोर आले पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आमदार पडळकर म्हणाले की, आमदार जयंत पाटील स्वत:च्या पुत्रासह खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरात गेले होते. जे नेते जाहीरपणे देवधर्म मानत नसल्याचे सांगतात, ते अशा भोंदूबाबांच्या चरणी कशासाठी गेले होते ? गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात हा जयंत पाटील यांच्या घरी पूजा सांगत असे, हे संपूर्ण ईश्वरपूरला ठाऊक आहे. अशा वासनांध व्यक्तीला राजाश्रय का दिला ? खरातच्या गावासाठी ४० कि.मी.ची पाण्याची जलवाहिनी देण्यात आली. यामध्ये जयंत पाटील यांचा मोठा सहभाग होता.
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री