इंधन सुरक्षिततेविषयी केंद्रशासनाने पावले उचलली आहेत ! – मुख्यमंत्री

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – इंधन महागणार असल्याची वृत्ते काही माध्यमांनी दिल्यानंतर पेट्रोल पंपांवर २-३ दिवसांपासून मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. अशा प्रकारे वृत्त प्रसारित करून नागरिकांमध्ये भय निर्माण करू नका. युद्धजन्य परिस्थिती असली, तरी केंद्र सरकारने इंधन सुरक्षिततेची पावले उचलली आहेत. ‘युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध आहे’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीविषयी पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.