
मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – कोकणातील आंबा-काजू पिकांच्या हानीविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ. यामध्ये शेतकर्यांना हानीभरपाई देण्याविषयी ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे फलोत्पादनमंत्री भरतशेठ गोगावले यांनी ६ मार्चला विधानसभेत दिली. अवेळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू यांचा मोहोर पडल्यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी, याविषयी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर गोगावले यांनी वरील आश्वासन दिले. या वेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव, सुनील प्रभु यांनी हानीभरपाईची मागणी सभागृहात केली. सुनील प्रभु यांनी हेक्टरी ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणी केली. यावर ‘बैठकीत योग्य तोडगा काढू’, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन