आमदार वीरेश बोरकर यांना उपोषण सोडण्याची केली विनंती

पणजी – नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रहित करण्याच्या मागणीवरून पणजी येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती होती. या भेटीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आमदार वीरेश बोरकर यांच्या प्रकृतीची मला काळजी आहे. मी आमदार वीरेश बोरकर यांच्याकडे त्यांच्या मागणीवरून चर्चा केली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झालेली आहे. मी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ (अ) रहित करण्याची मागणी विधानसभेत उठवून त्यावर तोडगा काढण्याची मी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी उपोषण सोडावे, असे मला वाटते.’’
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर