
उल्हासनगर – धोबी घाट नाका येथे मुरबाडपासून कल्याणपर्यंत अवैधपणे गोवंशियांना नेणार्या ट्रकचालकावर १७ फेब्रुवारीच्या रात्री कारवाई करण्यात आली आहे. यात ८ म्हशी आणि ३ पारडे अशा एकूण ११ गोवंशियांचा समावेश होता. गोरक्षक श्री. मनोज भोर यांच्या पथकाने पोलिसांचे साहाय्य घेऊन गोवंशियांना पकडले. (गोवंशियांचे रक्षण करणार्या गोरक्षकांचे अभिनंदन ! – संपादक) बनावट पावतीवर गोवंशियांची वाहतूक करणार्या ट्रकचालकावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (पोलिसांची फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक) ट्रकमध्ये गोवंशियांचे चारापाण्याचे, तसेच उभे रहाण्याचेही हाल झाले होते; पण सर्व गोवंशीय सुखरूप होते.
संपादकीय भूमिकागोवंशियांची अवैधपणे वाहतूक केली जाण्याला गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही न होणेच कारणीभूत ! |
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !