
नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात ‘अस्परजिलस’ प्रजातीच्या बुरशीचा संसर्ग होतो. अशा बुरशीचा संसर्ग झालेली भगर खाण्यात आल्यास अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खातांना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (बुरशीचा संसर्ग असलेली पाकिटे बाजारात येणार नाहीत, यासाठी प्रशासन काय प्रयत्न करणार, हे समजले पाहिजे ! – संपादक)
अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने भगर विक्री करणार्या दुकानांची पडताळणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या विक्रेत्यांवर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
संपादकीय भूमिकाप्रशासनाने उपवासाला भगर खातांना केवळ काळजी घेण्याचे आश्वासन करण्याऐवजी त्यामधील अडचणी सोडवणे अपेक्षित ! |
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !