मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३० घरे जाळली !

इंटरनेट सेवा बंद !

इंफाळ – मणीपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात ३० हून अधिक घरे जाळण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मणीपूर सरकारने उखरुलमध्ये ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. उखरुलमधील तंगखुल नागा समुदायाच्या सदस्यांवर झालेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून हा हिंसाचार उसळला आहे.