राज्यातील वीजदराच्या वाढीवर पुणे येथे तिसरी ‘ई-जनसुनावाणी’ पूर्ण !

 

पुणे – ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगा’कडून (‘एम्.ई.आर्.सी.’कडून) वीजदराच्या वाढीविषयी तिसर्‍यांदा ‘ई जनसुनावणी’ घेण्यात येत असल्याने वीज ग्राहकांमधून संभ्रम आणि अप्रसन्नता व्यक्त होत आहे. यापूर्वी घेतलेल्या ‘इ जनसुनावणीं’वर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही पुन्हा जनसुनावणी का घेतली जात आहे ? या सुनावणींमुळे पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप होत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण केली जात आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘महावितरण’ने आधी ५६ सहस्र कोटी रुपयांची दरवाढ मागितली होती, ती आता १ लाख ३५ सहस्र कोटी रुपयांवर कशी गेली ? याचीही चौकशी झाली पाहिजे.’’

संपादकीय भूमिका

  • कोणताही निर्णय न घेता पुन्हा-पुन्हा सुनावणी का घेतली जात आहे ? यातून आयोगाची निर्णयक्षमता अल्प असल्याचे दिसून येते !
  • वारंवार सुनावणी घेऊन पैशाचा अपव्यय करणार्‍या आयोगावर सरकारने कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !