वर्षारंभी सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्‍व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्‍या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्‍या आहेत.