सूक्ष्म जग अनुभवण्याची क्षमता नसलेले बुद्धीप्रामाण्यावादी !

सूक्ष्म जग अनुभवण्याची क्षमता नसलेले बुद्धीप्रामाण्यावादी !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे बुद्धीप्रमाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

म्हणे सर्वधर्मसमभाव !

म्हणे सर्वधर्मसमभाव !

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात. असा अर्थ एका तरी धर्मात सांगितलेला आहे का ? तरी अतीशहाणे ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

‘भ्रष्टाचार नाही’, असे एकही क्षेत्र नाही. सदनिका घ्यायची असली, तरी रोख (काळा पैसा) आणि धनादेश यांद्वारे रक्कम द्यावी लागते. सदनिका विकणार्‍या ५-१० जणांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली की, सर्वच सदनिका-विक्रेते काळ्या पैशांतील व्यवहार तात्काळ थांबवतील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांनी हे लक्षात घ्यावे !

पोलिसांनी हे लक्षात घ्यावे !

‘पोलिसांना ‘जनता आपली मुले आहेत’, असे वाटले पाहिजे, तरच त्यांच्याकडून नोकरी योग्य तर्‍हेने होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पू‍र्वीचे राजे आणि आजचे शासनकर्ते यांच्यातील भेद !

पू‍र्वीचे राजे आणि आजचे शासनकर्ते यांच्यातील भेद !

‘पूर्वी राजाला प्रजा पुत्रवत वाटत असे. आता लोकशाहीत ‘शासनकर्ते प्रजेला लुबाडण्यासाठी आहेत’, असे वाटते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !

राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांचे नेते आणि देवाचे भक्त यांच्यातील भेद !

राजकीय पक्षांचे नेते आणि देवाचे भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे  शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !

कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे  शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !

‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼ हाच मार्ग !

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼ हाच मार्ग !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले