बहुतांश राजकीय पक्ष जनताद्रोही !

बहुतांश राजकीय पक्ष जनताद्रोही !

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे आणि देशाचे भले व्हावे म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्यासंदर्भात ते काही करतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, स्वरक्षणार्थ तरी भग‍वंताची उपासना करा !

हिंदूंनो, स्वरक्षणार्थ तरी भग‍वंताची उपासना करा !

‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वार्थी राजकारणी आणि नि:स्वार्थी साधक !

स्वार्थी राजकारणी आणि नि:स्वार्थी साधक !

‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील होणे आवश्यक !

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील होणे आवश्यक !

‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अधिवक्त्यांच्या अशा शिक्षणाचा काय उपयोग ?

अधिवक्त्यांच्या अशा शिक्षणाचा काय उपयोग ?

‘गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न करणारे अधिवक्ते असतात, म्हणजे त्यांना अधिवक्ता होण्याचे शिकवणार्‍या महाविद्यालयांत नैतिकतेचे मूलभूत सिद्धांत शिकवले जात नाहीत. अशा शिक्षणाचा काय उपयोग ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे श्रेष्ठत्व !

अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे श्रेष्ठत्व !

ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीच्या तुलनेत भक्तीयोग हा प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा सोपा मार्ग आहे, उदा. देवपूजा, स्तोत्रपठण करणे, दैनंदिन कृती करतांना नामजप करणे. इत्यादींमुळे भक्तीयोगानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती होण्याचे प्रमाण अधिक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

‘चांगली बातमी आहे’, असा एक दिवस तरी हिंदू आणि भारत यांच्यासाठी आहे का ?’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले