व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

५३ वर्षांची प्रतीक्षा !

अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एवढा विलंब होण्यास उत्तरदायी असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडूनच धरणासाठी झालेला अतिरिक्त खर्च वसूल करायला हवा, तसेच त्यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाईही झाली पाहिजे.

युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’, म्हणजे एखादा राजकीय पक्ष काढण्यासारखे नव्हते, तर त्यामध्ये ‘सर्वसामान्यांपासून प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीला आपले वाटेल’, असे प्रजेचे ते राज्य होते आणि ते ज्या परिस्थितीमधून उभे राहिले, त्याला ‘एका नव्या युगाचा आरंभ’ असे म्हटले गेले.

विदेशी नको देशी झाडेच लावा !

देशी झाडांच्‍या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्‍येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्‍यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्‍या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्‍यापासून परावृत्त करूया !

युवावर्गाचे कर्तव्य काय ?

एकूणच जगाची स्थिती पाहिल्यास कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे युवावर्गाला राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे आणि करून घेणे आवश्यक आहे !

अधिकार्‍यांची मनमानी नको !

न्‍यून प्रमाणात पाणीपुरवठा झाल्‍याने सामान्‍यजन आणि शेतकरी यांचे होत असलेले हाल अधिकार्‍यांना दिसत नाहीत का ? अधिकार्‍यांचा केवळ स्‍वतःचा भ्रमणभाष परत मिळावा, एवढाच विचार का झाला ?

विद्यार्थीदशा महत्त्वाची !

आपल्या जीवनात काही भव्य दिव्य घडायचे असेल, तर त्या गोष्टीचे ध्येय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते ईश्वरप्राप्तीचे असो की, वैभवप्राप्तीचे ! विद्यार्थीदशेत असतांना जसा शिकण्यातील आनंद घेत होतो तसाच आनंद जीवनभर घेत राहूया !

‘गायरान’ मोकळे करा !

मुक्या जनावरांच्या हक्काच्या जागेवर अवैधरित्या ताबा मिळवणार्‍यांवर सरकारने कठोरातील कठोर कारवाई करायला हवी. या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’च हवे !

रिक्‍शाचालकांची मनमानी ?

वाहतुकीचे नियम तोडणार्‍या आणि जादा प्रवासी घेणार्‍या रिक्‍शाचालकांवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने सातत्‍याने कारवाई केली, तरच रिक्‍शाचालकांवर वचक निर्माण होईल.

शुभमंगल सावधान !

एकमेकांच्या साहाय्याने जीवनातील सुख-दुःख यांमध्ये खंबीरपणे उभे राहून पुढे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारा, समाजव्यवस्थेची घडी बसवून देणारा, सुखी-सुरक्षित, उन्नत जीवनाची दिशा देणारा संस्कार म्हणजे ‘विवाह संस्कार !’