हिंदु राष्ट्रातील कायद्यांच्या पालनाने जनतेची साधनाही होईल !
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विविध राजकीय पक्ष ‘स्वतःच्या पक्षाचे राज्य हवे’, यासाठी पैसे वाटप इत्यादी वाईट मार्गांचा वापर करतात. याउलट साधक आणि भक्त ‘ईश्वराचे राज्य स्थापन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य.’ याउलट भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत बहुतेक सर्वच पक्षांचे राज्य ‘स्वतःचे, स्वतःसाठी आणि स्वतःकरता चालवलेले राज्य’, असे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हल्ली निवडणुकीत मत देतांना ‘जास्त चांगला कोण आहे ?’, याऐवजी ‘कमी वाईट कोण आहे ?’, याचा विचार करून मतदार मत देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात शालेय शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ‘माणुसकी’ हा विषय सर्वांना शिकवला जाईल आणि सर्व सात्त्विक व्हावेत, यासाठी त्यांच्याकडून साधनाही करून घेतली जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले