असे नेते देशाचे भले करू शकतील का ?

असे नेते देशाचे भले करू शकतील का ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे.

साम्यवादाची निरर्थकता !

साम्यवादाची निरर्थकता !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻहिंदुʼ शब्दाची सर्वव्यापकता !

ʻहिंदुʼ शब्दाची सर्वव्यापकता !

‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती आहे, ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’ म्हणजे ‘हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा नाश करणारा.’ किती हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे शिकवतात ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे अधिक भयावह प्रदूषण !

हे अधिक भयावह प्रदूषण !

‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि ईश्वराची आराधना करणारे साधक यांच्यातील भेद !

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि ईश्वराची आराधना करणारे साधक यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.

हे भारतासाठी लांच्छनास्पदच !

हे भारतासाठी लांच्छनास्पदच !

‘आता बर्‍याच व्यवहारांच्या एकूण खर्चात अधिकृत खर्चासह ‘लाच देण्यासाठी किती खर्च होईल ?’, हेही लक्षात घेतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यासाठी तरी देवाचे भक्त व्हा !

यासाठी तरी देवाचे भक्त व्हा !

‘तिसर्‍या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले