ग्लानी आलेल्या धर्माला तेजतत्व देण्याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्था यांनी केले ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, डोंबिवली
प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य या दृष्टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्याकडून भक्तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्त केला आहे. केवळ प्राप्त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे अवघे आयुष्यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्थेचा डोलारा उभा केला.