विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथे होणार आहे. ३ डिसेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय आला. कोरोनाच्या संसर्गामुळे अधिवेशन केवळ २ दिवस घेण्यात येत आहे.

संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्याची मागणी करणार्‍या याचिकाकर्त्याला १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात येऊ नये, यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्यासाठीची मागणी अधिवक्ता हर्षल मिराशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम सूडबुद्धीने ! – माजी मंत्री राम शिंदे, भाजप

सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.

राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गोव्यातील आर्चबिशपांचाही विरोध

अनेक प्रकल्पांना विरोध करतांना त्यात चर्चप्रणित संघटनांचा सहभाग असतो आणि ख्रिस्ती समाजाची संख्याही अधिक असते. याचे कारण यातून लक्षात येते. हिंदूंनी यातून शिकावे !

वीजदेयकांविषयीच्या तक्रारींचे निवारण होत नाही, तोपर्यंत वीजदेयके भरणार नाही ! – भाजपची मोर्च्याद्वारे चेतावणी

वीजदेयकांचा प्रश्‍न गेले अनेक मास वारंवार पुढे येत आहे ! प्रशासन त्यावर तत्परतेने काही तोडगा का काढत नाही ?

(म्हणे) ‘जुने गोवे हा ‘वारसा विभाग’ घोषित करा !’

विजय सरदेसाई जुने गोवे या चर्चच्या परिसराचे संरक्षण करण्याची मागणी करतात, त्याप्रमाणे गोव्यात अनेक प्राचीन मंदिरेही आहेत. त्यांच्या जतनासाठी कृती करण्याची मागणी सरदेसाई का करत नाहीत ?

अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंरबला पणजी येथे सत्कार

मूळचे सरगवे, दोडामार्ग येथील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय भारतीय सैनिक सुभेदार अजय अनंत सावंत यांचा सन्मान सोहळा  ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. 

सत्तेवर आल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला विनामूल्य पाणी आणि वीज पुरवणार ! – मगोप

वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मगोप सत्तेवर आल्यास राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल,